मनातल्या गप्पांना श्रोत्यांची गरज नसते.
वाटलीच गरज तर, हवे ते श्रोते हवे तेव्हा आणि हव्या त्या जागेवर बसवता
येतात.
हव्या त्या श्रोत्याची, हवी तेव्हा आणि हवी ती दाद मिळवता येते.
या रंगमंचाचे कलाकार,कथाकार, निर्माता, निर्देशक....सगळे काही आपणच.
खऱ्याखुऱ्या आयुष्यात नाही वागत असली तरी, इथली सर्व पात्रं
आपल्या मर्जीप्रमाणे वागतात.
हवं तेव्हा बोलतात, हवं तेव्हा हसतात, हवं ते ऐकतात. म्हणून इथे खोटं खोटं का होईना पण सुख
अनुभवता येतं.
पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात ??? तिथे मात्र...
रिकाम्या खुर्चीपेक्षा अरसिक श्रोते जास्त त्रास देतात.
No comments:
Post a Comment