Saturday, August 3, 2013

नियती.....



कधी कधी असं होतं की, मन जे सांगतंय ते कितीही खरं असलं आणि अशक्य नसलं तरी
आपल्यातलाच आपल्याच मनाचा एक भाग ते मान्य करायला तयार नसतं.
एक सांभाळताना दुसरं निसटत असेल तर, तेव्हा माणसाची खरी परीक्षा येते.
नियती हुशार असते. कोणत्याही परिस्थितीचे खापर स्वतःवर घ्यायला ती तयारच नसते.

कधीकधी आपल्यासमोर नियती पर्याय ठेवते. काय निवडावं हे आपल्या हातात असतं.
आवडलेलं, हवं असलेलं समोर असतं पण, निवडण्याची मुभा नसते.

नियती परिस्थितीतच अशी आणते की, पाय बांधून मोकळं रान देते आणि सांगते की, "जा, धावत जा."
पायातली बंधनं तोडून पुढे जाणं अशक्य नसतं.
पण ज्यासाठी बंधनं तोडावी, ते मृगजळ निघालं तर ? ही भीती असते.

पुढचा पश्चाताप टाळण्यासाठी आम्ही सध्याचा मनस्ताप निवडतो.

मनात आमच्या.....खूप काही मुरलेलं असतं....
खूप काही सांगूनही.....खूप काही उरलेलं असतं....
मन आमचे नकळत....कित्तीतरी गोष्टीसाठी झुरलेलं असतं..
आम्ही पुरवून घेतलेलं...जगाच्या नजरेत मात्र नेहमीच पुरलेलं असतं...

No comments:

Post a Comment